Pages

Monday, 17 July 2017

आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई कधी?

पिंपरी - आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कायद्याने मोफत शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, काही शाळांचे प्रशासन या बालकांचा हक्क डावलून कायद्याची पायमल्ली करीत आहेत. असाच प्रकार काळेवाडीतील नगरसेविकेच्या शाळेत घडला. शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्याने कारवाईचे आदेश दिल्यावर हाकललेल्या मुलांना त्यांनी वर्गात घेतले. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर शिक्षण विभाग कारवाई का करत नाही? अशा प्रश्‍न आता पालक विचारू लागले आहेत.

No comments:

Post a Comment