Pages

Tuesday, 30 October 2018

'तिसऱ्या मुंबई'चा तळेगाव हा केंद्रबिंदू : गिरीष बापट

पुणे : भविष्यात तिसरी मुंबई होणार असेल; तर तळेगाव हा विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे सांगितले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment