Wednesday 8 November 2017

PCMC keen to execute town planning schemes in Charholi

Pimpri Chinchwad: The civic body is keen on executing town planning schemes in Charholi for planned development as a pilot project on the lines of Ahmedabad.

Pimpri Chinchwad mayor Nitin Kalje shared this thought with TOI while speaking about the study tour of corporators and civic officials to Ahmedabad for studying the BRTS bus service there.

रिंगरोडमध्ये फेरबदल?

प्राधिकरणाकडून आखणी बदलण्याची कार्यवाही

पिंपरी-चिंचवडमधील उच्चक्षमता द्रुतगती (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट - एचसीएमटीआर) या वर्तुळाकार मार्गाची आखणी बदलण्याची कार्यवाही चालू असून, त्याबाबत निर्णय विचाराधीन आहे, असे नवनगर विकास प्राधिकरणाने लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे रस्तारुंदीकरणाने बाधितांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आखणीची प्रक्रिया सरकार मान्य करणार का? याबाबतची टांगती तलवार कायम आहे.

आंद्रा, भामा आसखेड जलवाहिनीला मिळणार वेग

  • सल्लागाराची नेमणूक ः प्रकल्पासाठी प्रशासनाच्या हालचाली
पिंपरी, (प्रतिनिधी) – आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी मे. डी. आर. ए. कन्सल्टंटला प्रा. लि यांची सल्लागार म्हूणन नेमणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर सात कोटी 28 लाख 37 हजार रुपयांचा खर्च होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी (दि.8) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

संशयितांमागे चौकशीचा ससेमिरा कायम

पिंपरी - नोटाबंदी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर परिसरासह पुणे विभागात संशयास्पद आर्थिक व्यवहार करणाऱ्या सुमारे पाच हजार जणांना प्राप्तिकर खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या संबंधितांची चौकशी अद्याप सुरू असून, त्यांच्यामागील ससेमिरा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आर्थिक व्यवहारात दोषी आढळणाऱ्यांवर प्राप्तिकर कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून कर आणि दंड वसूल करण्यात येणार आहे. पुणे विभागातील या सर्व जणांच्या व्यवहारांची चौकशी पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. 

नोटाबंदीनंतर कॅशलेसद्वारे रेल्वेला 19 कोटींचे उत्पन्न

पुणे - नोटाबंदीनंतर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल 19 कोटी 41 लाखांचे उत्पन्न कॅशलेसच्या माध्यमातून मिळाले आहे. त्यासाठी पुणे विभागाच्या वतीने 47 रेल्वे स्थानकांवर तब्बल 131 पीओएस मशिन्स लावल्या. परिणामी गेल्या अकरा महिन्यांत रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणावर कॅशलेसकडे वळाले असल्याचे समोर आले आहे.

अधिकाऱ्यांसाठी आर्थिक कुरण

पिंपरी - हिंजवडी, मारुंजीतील बेकायदा बांधकामे ‘पीएमआरडीए’तील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी आर्थिक कुरण ठरत आहेत. त्यांच्याकडूनच या बांधकामांना अप्रत्यक्षरीत्या खतपाणी घातले जात असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केल्याने खळबळ उडाली.

‘अनधिकृत’ची नरकपुरी

पिंपरी-चिंचवड शहराने कोणाचे पाप पोटात घ्यावे ते एकदा ठरवावे. अनधिकृत बांधकामांमुळे हे सुंदर शहर राज्यात बदनाम झाले. तीस ते चाळीस वर्षांत तब्बल पावणेदोन लाखांवर अनधिकृत घरे उभी राहिली. हे काम एका रात्रीत झालेले नाही. मतांच्या राजकारणासाठी यातील अर्धेअधिक बांधकामे नियमित करायचा निर्णय झाला. त्याचा लाभ आज राज्याला झाला. मुळात ही बांधकामे उभी राहिली, त्याचे कारण परवडणारी घरे द्यायची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनी बोटचेपे धोरण स्वीकारले. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीसाठी त्यांनी स्वस्त घरांची निर्मिती कमी केली. खासगी बिल्डरचे घर परवडत नाही आणि जमीन खरेदी करून इमारत बांधणे आवाक्‍यात नाही, अशा परिस्थितीत घराचे स्वप्न पाहिलेल्यांनी कायदे धाब्यावर ठेवून मनमानी पद्धतीने घरे उभी केली. प्राधिकरणाने चुका केल्या त्याच महापालिका, एमआयडीसी आणि म्हाडा या संस्थांनी केल्या. परिणामी शहर बकाल झाले. प्राधिकरणाच्या नियंत्रण क्षेत्रावर (२१०० हेक्‍टर) या संस्थेचे नियंत्रण सुटल्याने नंतर तिथे उभी राहिलेली काळेवाडीसारखी वसाहत अखेर महापालिकेत समाविष्ट झाली. यातील पाप करणारे प्राधिकरण सहीसलामत सुटले. एमआयडीसीने कामगारांच्या नावाखाली बनावट सोसायट्या तयार करणाऱ्या दलाल, भूमाफियांना भूखंडांची खिरापत वाटली. त्यांनीही मनमानी केली, ते पापसुद्धा महापालिकेने पोटात घेतले. खुद्द महापालिकेनेही बेघरांसाठी घरे आणि गरिबांसाठी घरांच्या विविध आरक्षित जागांवर टक्केवारीच्या नादात धंदाच केला. या सर्वांचा एकत्रित परिणाम शहर अनधिकृतच्या खाईत लोटले. घरचे झाले थोडे अन्‌ व्याह्याने धाडले घोडे, अशी आजची स्थिती आहे. कारण हिंजवडी पंचक्रोशीतील बेसुमार अनधिकृत बांधकामे. हे पापसुद्धा पिंपरी-चिंचवडच्या माथी मारायचा डाव आहे.

आयटीआयच्या शुल्कात महापालिकेकडून कपात

पिंपरी - महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील आयटीआय शुल्कात कपात केली आहे. यामुळे १५०० रुपयात औद्योगिक तंत्र शिक्षण घेणे सोपे होणार आहे. 

शहरात चिमुकली असुरक्षित

पिंपरी – चिमुकल्याचे अपहरण, लैगिक छळ, खंडणीच्या नावाखाली लूट, अपघात, सायबर क्राईम, मोठ्यांचे चुकीचे अनुकरण, शाळांमधील अनैतिक प्रकार, विनयभंग अशा एक ना अनेक कारणांमुळे शहरात चिमुकली अनावर झालेल्या रागातून व चुकीच्या अनुकरणामुळे असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात शून्य ते 14 वर्ष वयोगटातील बालके असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

AKS win PCMC leg of Srujan Super 20 Youth Kabaddi C'ship

Adinath Kabaddi Sangha edged out Aradhya Pratisthan 20-17 to win the PCMC leg of the Srujan Super 20 Youth Kabaddi Championship played at Dyan Prabhodini Grounds at Nigdi. In the final, raiders Adinath Ghule (8), Akash Barge (5) helped Adinath ...

…त्या अभियंत्यास बडतर्फ करा

काळेवाडी रस्ता प्रकरण : नगरसेवक संदीप कस्पटे यांची मागणी
पिंपरी – काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील अठरा मीटर रस्त्याच्या कामास पूर्णत्वाच्या आधीच पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या कार्यकारी अभियंत्यास बडतर्फ करा अशी मागणी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुन्हा रस्त्यावर

पिंपरी – नोटबंदीला एक वर्ष उलटले तरी बाजारपेठांची स्थिती विदारक आहे. अनधिकृत घरे नियमितीकरणातील किचकट अटी-शर्ती, शास्तीचा जाचक मुद्दा आणि बोपखेलच्या रस्त्यासह रिंगरोडच्या बाबतीत नागरिक संदिग्ध अवस्थेत आहेत. त्यातच नागरिकांना समाधानी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या दैनंदीन सुविधा देण्यात सरकार आपयशी ठरले आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या गुरूवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आणि युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.