Wednesday 12 December 2012

शेतकर्‍यांनो, थेट ग्राहकांना विका माल!

शेतकर्‍यांनो, थेट ग्राहकांना विका माल!: पुणे। दि. १0 (प्रतिनिधी)

मुंबईसह राज्यातील महानगरांमध्ये आता शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही शेतकरी शेतमाल विकताना दिसणार आहे. कृषी व पणन विभाग या योजनेचे नियंत्रण करणार असून, त्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

शहरात विविध ठिकाणी विक्री केंद्र उभी उभारता येईल का, याबाबतही अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. यासाठी स्थानिक बाजार समितीने शेतकर्‍यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी शहरात कोठेही माल विकू शकतील. प्रसंगी शेतकर्‍यांना पोलीस संरक्षणही पुरविण्यात येईल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले. प्रादेशिक बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, याबाबत बाजार समितीकडून सहकार्य मिळेल. आडत्यांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका बसल्यास, शहरात तातडीने विक्री केंद्र सुरू केली जातील.

शेतकर्‍याला जर स्वत:चा माल स्वत: विकायचा असेल, तर त्याला कोणत्याही बाजाराचे बंधन राहणार नाही. शहरातील रस्त्यांवरही तो थेट ग्राहकाला माल विकू शकेल.
- राधाकृष्ण विखे-पाटील, कृषी व पणन मंत्री

No comments:

Post a Comment