Monday 13 May 2013

अपुर्‍या पाणीपुरवठय़ाने नागरिकांचे हाल

अपुर्‍या पाणीपुरवठय़ाने नागरिकांचे हाल: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

गेले दोन दिवस कमी दाबाने व अल्प वेळ पाणी येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाण्याअभावी रहिवाशी, व्यावसायिकांचे हाल झाले. दोन दिवसांपासून शहरातील विविध भागांत कमी दाबाने व अल्प पाणीपुरवठा होत आहे. तर काही भागांत सकाळी, तर काही भागांत संध्याकाळी पाणीच आले नाही. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. ऐन साप्ताहिक सुटी दिवशी शनिवारी व रविवारी कमी प्रमाणात पाणी आले. पिण्याचे पाणी नसल्याने बोअरींगच्या पाण्याचा वापर रहिवाशांना करावा लागला. विशेषत हॉटेल व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली. हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना विचारूनच पाणी दिले जात होते.

No comments:

Post a Comment