Tuesday 17 December 2013

भांडणे मिटविण्याचा प्रयत्न करा : गिरीमहाराज

पिंपरी : महाभारतात कौरव-पांडवांचे वैर शमविणे शक्य होते; मात्र ते वैर वाढावे यासाठी कर्ण व शकुनीने खतपाणी घातले, असे प्रतिपादन स्वामी श्री गोविंददेव गिरीमहाराज यांनी येथे केले. भांडणे मिटविण्यातून एखाद्याचा दाह कमी होतो. शिवलिंगावर अभिषेक केल्याचे पुण्य त्यातून मिळते, म्हणूनच भांडणे न लावता ती मिटविण्याचा प्रयत्न करा. परमात्मा तुमच्यावर कृपा करेल, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment