Sunday 23 February 2014

तीन वर्षांत १११ ठार

वाकड : मुंबई-बंगळूर महामार्गावरील किवळे फाटा ते कात्रज बाह्यवळण बोगद्यापर्यंतच्या ३४ किमी अंतरात तीन वर्षांत सुमारे ३00 वर अपघात झाले असून, त्यात १११ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ४७ गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे महामार्गाची दुभाजकाची तोडफोड करून वाहने जाण्यासाठी केलेली खासगी सोय, तीव्र उतार, वळणे, अपघातस्थळी रिफ्लेक्टर पट्टय़ांची कमतरता अन् नियम न पाळणार्‍या वाहन चालकांचा हलगर्जीपणा यामुळे अपघाताचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तर येथे काही जण अतिघाईचे शिकारी होतात.

No comments:

Post a Comment