Monday 31 March 2014

सरकारने आश्वासने पाळली नाहीत - लक्ष्मण जगताप

पिंपरी-चिंचवड वासियांच्या प्रश्नांची विधानसभेत दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत, म्हणूनच आपण आमदारकीचा राजीनामा दिला. आता जनतेच्या पाठबळावरच मी खासदार होणार असल्याचा सार्थ विश्वास आमदार लक्ष्मण यांनी थेरगाव येथे व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) चे उमेदवार व मनसे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सोनाई मंगल कार्यालय थेरगांव येथे शनिवारी रात्री मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.

No comments:

Post a Comment