Tuesday 4 April 2017

उद्योगनगरीला लालदिव्याचे वेध

पिंपरी - महापालिका निवडणुकीत उज्ज्वल यश मिळवून भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आणल्यानंतर आता स्थानिक नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार मोठ्या जबाबदारीचे वेध लागले आहेत. सध्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे सरकार स्थिर राहण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याचीही शक्‍यता व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment