Monday 26 June 2017

प्राधिकरणाच्या नोटिसांमुळे रहिवाशांना चिंता

कारवाईची कुऱ्हाड : प्रसंगी आंदोलनाचा इशारा
पिंपरी, (प्रतिनिधी) – प्राधिकरणाचे आरक्षण निश्‍चित झाल्यामुळे थेरगावातील अर्धा, एक गुंठ्यातील बाधीत सुमारे 800 आणि वाल्हेकरवाडीतील 500 घरांवर कारवाई होणार आहे. येथील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. नागरिकांनी प्राधिकरण, महापालिका प्रशासन, पालकमंत्री गिरीष बापट, स्थानिक खासदार आणि आमदार यांच्या माध्यमातून शासन दरबारी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. प्रत्येकवेळी अपयश येऊन नैराश्‍य वाढू लागल्याने सुमारे 10 हजार रहिवाशांनी आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे.

No comments:

Post a Comment