Tuesday 31 October 2017

थोडी खुशी, थोडा गम

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रश्‍न सुटले नाहीत म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले. आज शहरात तीन खासदार आहेत. त्यात शिवेसेनेचे दोन आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य) आहे. तीन आमदारांपैकी दोन भाजपचे एक शिवसेनेचा आहे. १२८ नगरसेवकांमध्ये तब्बल ७७ भाजपचे आहेत. अशा प्रकारे गल्ली ते दिल्ली अगदी घसघशीत पाठबळ भाजपच्या मागे आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती. ती जवळपास संपली. याचे कारण लोकांना भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, पारदर्शक, गतिशील कारभार हवा आहे. गुन्हेगारीपासून संपूर्ण मुक्ती हवी आहे. लोकसभा नंतर विधानसभा आणि वर्षापूर्वी महापालिका त्यासाठीच मतदारांनी भाजपकडे सोपविली. गेल्या तीन वर्षांतील ‘काय साधले, काय राहिले’ याचा लेखाजोखा मांडला तर, बऱ्यापैकी प्रश्‍न सुटले आणि आजही असंख्य मोठे प्रश्‍न आ वासून उभे आहेत; हे मान्य करावे लागेल. पूर्वीपेक्षा विकासकामांचा वेग वाढला, पण निधीची चणचण आहेच. परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबरच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने शहराचे राजकीय वजन वाढले आहे.

No comments:

Post a Comment