Wednesday 31 January 2018

‘अजंठानगर’ प्रकल्पाशेजारी वाढतेय झोपडपट्टी

पिंपरी - शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी झोपडपट्ट्यांचे सरकार पुनर्वसन करते. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे सरकारच्या या हेतूला हरताळ फासत आहे. असाच प्रकार अजंठानगर पुनर्वसन प्रकल्पाच्या बाबतीत घडला आहे. पुनर्वसन झालेल्या झोपड्या त्याच ठिकाणी आहेत, तर शेजारी झोपडपट्टी वाढत असून, अनेकांना एकापेक्षा जास्त सदनिका दिल्याच्या तक्रारी सरकार दरबारी दाखल आहेत. प्रकल्पात सदनिका वाटपात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. के. दोडके यांनी पुराव्यानिशी मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांकडे केली आहे. 

No comments:

Post a Comment