Tuesday 19 June 2018

दरवर्षी पदवीदान करणे विद्यापिठांसाठी अनिवार्य

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विद्यापिठांना लेखी सूचना 
नवी दिल्ली – देशातील विद्यापिठांनी दरवर्षी पदवीदान करणे अनिवार्य करण्याबाबतची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही विद्यापिठांकडून दरवर्षी पदवीदान कार्यक्रम केला जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही लेखी सूचना करण्यात आली आहे. विद्यापिठांनी दरवर्षी नियमितपने पदवीदान कार्यक्रम केलाच पाहिजे. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी हा मोठा महत्वाचा आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद वाटावा असा हा सोहळा असतो, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विद्यापिठांनी यापूर्वी पदवीदान समारंभ कधी केला आहे, त्याचा तपशीलही सादर करण्याच्या सूचना मंत्रालयाने केल्या आहेत.

No comments:

Post a Comment