Monday 2 July 2018

पर्यावरण मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

आळंदी : प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू शकत नसाल तर तुम्ही महापालिका चालविण्यासाठी नालायक आहात. पिंपरी महापालिकेबरोबर लोणावळा आणि तळेगाव नगरपालिका हद्दीतूनही प्रक्रिया न करताच इंद्रायणीत सोडलेले सांडपाणी तत्काळ थांबवले नाही तर गेली दोन वर्षांपासून कार्यरत अधिकारी आणि नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा विनाजामिन गुन्हा दाखल करून तत्काळ अटकेच्या कारवाईस भाग पाडू. वेळप्रसंगी तुमच्याविरोधात नदीप्रदुषणाचा विषय नागपूर अधिवेशनात मांडू अशा शब्दात संतप्त झालेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

No comments:

Post a Comment