Tuesday 10 July 2018

पोस्टमनची भरती प्रक्रिया सरकारने करावी

पिंपरीः नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज आणि ऑल इंडिया पोस्ट व एम्प्लॉईज पोस्टमन व एम.टी.एस या संघटनांनी महाराष्ट्रभर संप पुकारला आहे. राज्यातील बेरोजगारांना केंद्र सरकारी नोकरी मिळेल आणि राज्यातील नागरिकांनाही सेवा देता येईल. यादृष्टीने ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी. राज्यभर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक ऑफिसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच कामगार शिल्लक आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 40 ते 45 टक्के पोस्टमन व एमटीएस कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत. सर्वच ऑफिसमध्ये राहिलेल्या कामगारांवर कामाचा बोजा पडत आहे. पोस्टमन कर्मचारी नागरिकांना व्यवस्थित सुविधा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व प्रकारच्या पोस्टमन व एमटीएसच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी व संघटनांनी सरकारकडे केली आहे.

No comments:

Post a Comment