Wednesday 11 July 2018

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे वाचन आणि आकलन शून्य

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा डंका राज्य सरकार पिटत असताना शिक्षण क्षेत्रातील दयनीय अवस्था समोर आली आहे. मंथन एज्युकेशनल इनिशिएटिव्ह या संस्थेच्या अहवालातून १२८४ विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्यांला वाचलेल्याचे आकलन होत नाही, तर ६८१ विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येत नसल्याची धक्कादायक माहिती स्पष्ट झाली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पुणे शहरातील ही अवस्था असेल तर राज्यातील इतर भागात काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment