Monday 27 August 2018

`राष्ट्रवादी'च्या काळातच पिंपरी स्मार्ट; भाजप महापौरांची अप्रत्यक्ष कबुली

पिंपरीः ``पिंपरी चिंचवडचा "स्मार्ट सिटी'त समावेश होण्यापूर्वीच शहराच्या पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथे झालेला आहे,'' असे सांगताना भाजपचे महापौर राहूल जाधव यांनी हा भाग पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातच स्मार्ट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली आज दिली. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या (त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक) पाठपुराव्यामुळेच हा भाग स्मार्ट झाल्याचेही महापौरांनी आवर्जुन सागितले. 

No comments:

Post a Comment