Friday 5 October 2018

राजगुरुनगरला दोन किलोमीटरपर्यंत रांगा

राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्यामुळे वाहतूक अडकून आज गुरुवारी (ता. ४) दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलिसही वैतागून गेले.

No comments:

Post a Comment