Wednesday 7 November 2018

‘नोटा’ला सर्वाधिक मते पडल्यास होणार अधिक फेरनिवडणूक!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांऐवजी ‘नोटा’ म्हणजेच कोणीही उमेदवार पसंतीचा नाही, या पर्यायास मतदारांनी सर्वाधिक पसंती दिल्यास अशा मतदारसंघात फेरनिवडणूक घेतली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या कोणत्याही कायद्यात ‘नोटा’चे महत्व अधोरेखित करणारी कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याने आयोगाने स्वत:च्या अधिकारात ‘नोटा’ला प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडे ‘नोटा’चे महत्व अधोरेखित करण्याची मागणी येत होती.

No comments:

Post a Comment