Monday 31 December 2018

राज्य सरकारचा नवा कायदा , भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना पकडल्यावर किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर जामीन मिळाल्याने पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चाप बसविला आहे. आता अशा अधिकाऱ्यांना मूळ पदाऐवजी दुसऱ्या विभागात रुजू होऊन कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. या निर्णयामुळे निलंबनाच्या काळातही कामावर हजर झालेले अधिकारी 'पूर्ण पगारी अन् बिन अधिकारी' ठरणार असून, त्यांनी यापूर्वी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यालयाची विभागीय चौकशी होणार आहे.

No comments:

Post a Comment