Sunday 30 March 2014

'त्यांनी' फक्त स्वतःच्या जमिनी सोडवून घेतल्या

थेरगावमध्ये अद्याप परिपूर्ण असे खेळाचे मैदान नाही, भव्य सांस्कृतिक हॉल नाही. प्राधिकरणातून फक्त स्वत:च्या जमिनी सोडवून घेतल्या आणि उर्वरीत जनतेला वा-यावर सोडलं. आघाडीची उमेदवारी मिळत असतानाही फक्त आणि फक्त जनतेच्या स्वाभिमानासाठी ती नाकारली. माझं नातं जनतेच्या स्वाभिमानाशी आहे ते मी कृतीतून दाखवून दिलं आहे. तुमचं काय?, असा जळजळीत सवाल लक्ष्मण जगताप यांनी थेरगाव येथे झालेल्या अखिल थेरगाव युवा मंचच्या मेळाव्यात विरोधकांना केला.

No comments:

Post a Comment