Sunday 2 March 2014

उद्योगनगरीला अपुरे पाणी, गृहप्रकल्पासाठी मात्र धो धो!

पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा उद्योगनगरीला अपुरा पडत असल्याने एकीकडे पवना धरणाशिवाय भामा-आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी आणण्याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून मात्र गृहप्रकल्पाला आणि कंपन्यांना पाणी पुरविण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी चिखलीतील एक गृहप्रकल्प आणि मावळातील नवलाख उंबरे येथील कंपनीसाठी बिगर सिंचन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment