Thursday 24 April 2014

अर्जाची मुदत संपणार असल्याची अफवा

पिंपरी : अकरावी वर्ग ऑनलाइन प्रवेशअर्ज भरताना थोडीशी जरी चूक झाल्यास तो स्वीकारला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत काही शाळांचे शिक्षक मार्गदर्शन व सहकार्य करीत नसल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात अर्ज भरण्याची मुदत दहावी निकालापर्यंत नसून ३0 एप्रिलपर्यंतच असल्याची अफवा पसरल्याने अर्ज भरण्यासाठी त्यांची धांदल उडाली आहे.

No comments:

Post a Comment