Thursday 15 May 2014

आता सगळेच तिकडे डोळे लावून बसलेत....!

उमेदवारांसह नागरिकांचीही उत्कंठा शिगेला
सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघा एकच दिवस आड राहिल्याने सगळे त्याकडे डोळे लावून बसले आहेत. त्या एका दिवसानंतर नागरिकांना आपण मत दिलेला उमेदवार विजयी येणार का,  खरंच सत्ताबदल होणार का,  देश कोणाच्या हातात जाणार आणि भारताचा पंतप्रधान कोण होणार , या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर या निवडणुकीत नशीब आजमवणा-या उमेदवारांना मतदारांनी आपल्याला कौल दिलाय का आणि आपण खासदार होऊन दिल्लीत जाणार का, या प्रश्नांची उत्तरेही तेव्हाच मिळतील. त्यामुळे उमेदवारांबरोबरच आता नागरिकांचीही उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

No comments:

Post a Comment