Saturday 17 June 2017

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे 50 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

पुणे, दि. 16 (प्रतिनिधी) – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…पक्षीही सुस्वरें आळविती… या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आजच्या काळात कृती करीत पर्यावरण रक्षणाकरीता संपूर्ण महाराष्ट्रात 50 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यासोबतच जय गणेश हरित वारीचा श्रीगणेशा देहूनगरीत झाला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने इंद्रायणीच्या तीरावर वृक्षारोपण करुन वारकरी मंडळींनी एकच लक्ष, देशी वृक्ष असा नाराही दिला.

No comments:

Post a Comment