Sunday 23 July 2017

दिघीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?

आयुक्‍तांकडे तक्रार : जनजागृती करण्याची मागणी
पिंपरी – दिघीच्या भारत मातानगर येथील एका महिलेचा डेंग्यूमुळे गुरुवारी (दि. 19) मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीही महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाकडून डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात नाही, अशी तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment