Monday 24 July 2017

गुगल मॅपची आवश्‍यकताच काय?

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे गांभीर्य शासनाने जाणले नसले, तरी ‘गुगल’ने निश्‍चितच जाणले आहे. त्यातून हिंजवडीच्या रस्तोरस्ती फलक लावून गुगलने ‘लाइव्ह गुगल मॅप’ची जाहिरात सुरू केली आहे. त्याच्याच आधारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणारे निम्म्याहून अधिक कर्मचारी घरबसल्या ‘ट्रॅफिकचे हाल’ जाणून घेत आहेत. तथापि, आम्हाला या गुगलची आवश्‍यकताच लागू नये, अशी तरतूद शासकीय यंत्रणांनी करावी, असा आग्रह ‘आयटीयन्स’नी धरला आहे. किंबहुना, या समस्येचे मूळ शोधून काढावे, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

No comments:

Post a Comment