Saturday 23 June 2018

सल्लागारांवर उधळपट्टी करणा-या भाजपला वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूंचे वावडे का? – अमित बच्छाव

पिंपरी (Pclive7.com):- आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल – रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचा आव आणणा-या भाजपने राष्ट्रवादीला बदनाम केले परंतू त्या आरोपात काहीच तथ्य आढळले नाही, त्याउलट भाजपने मात्र गत वर्षी वारक-यांना वाटप केलेल्या ताडपत्री खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले. भयमुक्त भ्रष्टाचार मुक्तीच्या वल्गना करीत सत्तेत आलेल्या भाजपचा मात्र ‘भ्रष्टाचार’ हाच अजेंडा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या वर्षी वारक-यांना कोणतीही भेटवस्तू न देणे म्हणजेच भाजपला पुन्हा एकदा भ्रष्टाचार होण्याची पक्की खात्री असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment