Thursday 7 June 2018

उत्पन्नाची अट शिथिल केल्याने आरटीई प्रवेशास पुन्हा संधी

पिंपरी - राज्य सरकारने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करीत उत्पन्नाची अट शिथिल केल्यामुळे यापूर्वी अर्ज न भरलेल्या पालकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर जे पालक दुसऱ्या फेरीच्या प्रतीक्षेत आहेत, ते आता अडचणीत सापडले आहेत. शाळा दहा दिवसांत सुरू होणार असताना पहिलीत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांसाठी पालकांची आता धावपळ सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment