Wednesday 25 July 2018

इंजिनीअरिंग कॉलेजांवर टांगती तलवार?

राज्यातील खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल अतिशय मंदावला असून, ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ५० ते १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे या कॉलेजांना कामकाज चालविणे अवघड होऊन पुढील वर्षी राज्यातील अशी इंजिनीअरिंग कॉलेज बंद पडणार आहेत. त्याचबरोबर अनेक कॉलेजांमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेन्टेशन आदी विद्याशाखा बंद कराव्या लागणार आहेत, अशी शक्यता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

No comments:

Post a Comment