Saturday 25 August 2018

वाहतूक कोंडीवर उत्तर कधी?

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाले; पण चाकणचे औद्योगीकरण होत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते, हे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, अवैध वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा, पथारीवाले यांची भर पडली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागू लागल्या. सहापदरीकरणाचे जाऊ द्या, पहिली चाकणची वाहतूक कोंडी सोडवा, अशी मागणी होऊ लागली. या वाहतूक कोंडीला आता सारेच वैतागले आहेत. 

No comments:

Post a Comment