Friday 10 August 2018

रिक्षांना स्कूल बसचा परवाना कसा?

मुंबई – शालेय बसला कमीतकमी 13 आसनाचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
तीन आसनी रिक्षांमध्ये आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबले जाते. विद्यार्थी रिक्षांमध्ये लटकत असतात.त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. त्यांचा जीव धोक्‍यात घातला जात आहे, असे स्पष्ट करून नियमांत दुरूस्ती करा अन्यथा आम्ही आदेश देतो, असे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला बजावले.

No comments:

Post a Comment