Tuesday 4 September 2018

हिंजवडीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीक अवर्स’ मध्ये ‘वन-वे’वाहतूक

हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी ही सर्वांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वी ‘गुगलवर हिंजवडी सर्च ‘ केल्यास परत येणे नाही असे येत होते. तर सध्या या वाहतुक कोंडीमुळे आयटी पार्कमधील ५६ कंपन्या स्थलांतर होण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे लगेचच सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन स्वतः यांनी शिवाजी चौकात उभा राहून वाहतुकीची समस्या जाणून घेतली. तसेच काही बदल केले, ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यातून काही वाहतूक बदलाचे पर्याय निवडले. हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीक अवर्समध्ये ‘वनवे’ चा पर्याय प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. तर लक्ष्मी चौक ते भूमकर चौक हाही वन-वे करण्याचा अंदाज वर्तवला आहे.

No comments:

Post a Comment