Tuesday 9 October 2018

देशातील ‘शाळा, कॉलेजांमध्ये एक तास खेळासाठी ठेवा’

चौफेर न्यूज – भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून, २०२० साली देशाची ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत असून, लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहण्यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिवसातून किमान एक तास खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, अशी विनंती भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना केली आहे.

No comments:

Post a Comment