Friday 23 August 2013

पाच सप्टेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय

पिंपरी : घरकुल योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करावा. २000 घरांचे वाटप करावे. दुसर्‍या टप्प्याचे काम सुरू करावे. बँकेने सर्वांचे कर्ज मंजूर करावे. सर्व १३२५0 लाभधारकांना घरे मिळावीत आदी मागण्यासाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने सभा घेण्यात आली. या वेळी ५ सप्टेंबरपासून आंदोलना तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरपीआय नेते बाळासाहेब भागवत, बाबा कांबळे, धर्मराज जगताप, प्रल्हाद कांबळे, पंचायतचे अध्यक्ष बळीराम काकडे यांचे या वेळी भाषण झाले. ५ सप्टेंबरपासून घरकुलधारकांचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी बरगल्ली गावडे, काळुराम वाघ, राजेश सूर्यवंशी, संभाजी तरस, नमदा वावगे, मैनाबाई सोनवणे, नंदा आल्हाट उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment