Thursday 23 March 2017

जवानांचे शौर्य स्मारक उभारणार

पिंपरी - भारतात 23 मार्च हा "हुतात्मा दिन' म्हणून साजरा केला जातो. क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतिवीरांप्रमाणेच भारताच्या सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांच्या शौर्यकथांचा प्रसार व्हायला हवा, अशी गरज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांच्या या भावनिक आवाहनाने प्रेरित झालेल्या नितीन चिलवंत यांनी त्याला कृतीतून प्रतिसाद दिला. नव्हे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये देशभक्ती चेतविणारे "अमर जवान स्मारक' आणि "कारगील शौर्य स्मारक' उभारले जावे, असे स्वप्न बाळगले आहे. भक्तीशक्ती शिल्पामुळे शहराची वेगळी ओळख आहे. अमर जवान आणि कारगील शौर्य स्मारकामुळे ती अधिक ठळक होईल, असा चिलवंत यांना विश्‍वास आहे.

No comments:

Post a Comment