Tuesday 30 May 2017

पदपथांचा ताबा फेरीवाल्यांकडेच

पिंपरी - शहरातील पदपथांची मालकी महापालिकेकडे असली, तरी म्हाळसाकांत चौक आणि संभाजी चौक येथील पदपथांचा ताबा मात्र फेरीवाल्यांकडेच आहे. 
पदपथावर चालण्याचा प्रथम हक्‍क पादचाऱ्याचा आहे, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच आपल्या निकालात सांगितले आहे. मात्र शहरात फिरताना महापालिकेकडून याचे पालन झालेले दिसत नाही. म्हाळसाकांत चौकात शाळेच्या बाहेर पदपथ फेरीवाल्यांनी व्यापला आहे. पदपथावर टपऱ्या असून, काहीजण रस्त्यावरही आपले सामान ठेवतात; तसेच पदपथालगत दुचाकी पार्क केलेल्या असतात. शाळा सुटण्याच्यावेळी शाळेच्या बस व पालकांच्या चारचाकी उभ्या असतात. यामुळे जेमतेम एक वाहनच येथून जाऊ शकते. ऐन गर्दीच्यावेळी विद्यार्थी व पालकांना वाहनांच्या गर्दीतून चालावे लागते.

2 comments:

  1. I think to solve this problem, government should bring rotation policy.
    Only limited hockers can use the allotted space for limited duration like (2 months) after every 2 months different hockers get chance to do business.create new hocker spaces or roads so that by rotation policy every hocker will get chance to grow.

    ReplyDelete
  2. Pedestrians who are most affected are silent hence nothing will happen. There should be an urge to change in the first place.

    ReplyDelete