Thursday 29 June 2017

नवे मार्ग, वारंवारिता वाढविण्याची गरज

पिंपरी - प्रवाशांची संख्या कमी असल्याने तोटा होणारे मार्ग बंद करून नवे बसमार्ग सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, काही मार्गांवरील गाड्यांची वारंवारिता वाढविली पाहिजे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत तीन बस आगार असून, त्यांच्यामार्फत दोन्ही महापालिकांच्या हद्दीत अनेक गाड्या चालविल्या जातात. काही गाड्यांना भरपूर प्रतिसाद, तर अनेक गाड्या रिकाम्या धावत असतात. कमी प्रवासी असलेल्या मार्गावर प्रशासनाने एकच बस ठेऊन तिच्या दिवसभर खेपा सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे तिचे वेळापत्रक कोलमडते. या बसची वाट पहात कोणी प्रवासी थांबत नाही. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. या गाड्यांचे प्रति किलोमीटर उत्पन्न (इपीके) २५ ते ३५ टक्के असल्यामुळे तोटा वाढतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment