Thursday 14 September 2017

जमिनीच्या वाटपाची प्रक्रिया होणार सुलभ

कौटुंबिक मालकीच्या जमिनीची कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटणी न झालेली लाखो कुटुंबे असून, त्यांना दिलासा देणारा निर्णय विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला आहे. आता या जमिनींची वाटणी करून सातबारावर वारसदारांची नावे नोंदविण्याबाबतच्या आदेशाची प्रक्रिया तहसीलदारांकडून केली जाणार आहे. जमिनीच्या वारसदारांनी एकत्र येऊन वाटणीसाठी सहमती असल्याचा एक अर्ज केला, तरी पिढ्यानपिढ्या रखडलेल्या कौटुंबिक मालकीच्या जमिनींचे विभाजन तहसीलदारांमार्फत होऊ शकणार आहे.

No comments:

Post a Comment