Tuesday 12 September 2017

शत प्रतिशत…तरीही सूर गवसेना!

सभागृहात पाशवी बहुमत, विषय समित्या, क्षेत्रीय कार्यालये सर्वत्र शत प्रतिशत सत्ता असतानाही महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सूर गवसत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेत प्रथमच सत्तांतर झाले. राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या उद्योगनगरीवासीयांनी भाजपच्या पदरात सत्तेचे दान टाकले. भाजपच्या महापालिकेतील सत्ता स्थापनेला सहा महिने उलटली आहेत. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील बेकीमुळे भाजपचा कारभार भरकटत चालल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच विरोधकही दुबळे असल्याने महापालिका कारभारात सुसूत्रता राहिली नाही.

No comments:

Post a Comment