Wednesday 27 June 2018

हातभट्ट्यांमुळे बालाजीनगरची वाताहत

भोसरी - येथील बालाजीनगरमधील तरुणांना हातभट्टीची दारू घराजवळच मिळत असल्याने व्यसनाधीन तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारूमुळे विवाहित तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे बालाजीनगरमध्ये वैधव्य आलेल्या महिलांची संख्या वाढत आहे. हातभट्टी दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतरही गुत्ते सुरूच असल्याने पोलिसांची लुटुपुटूची कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. झोपडपट्टीमधील तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी सर्वच हातभट्टीचे गुत्ते बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment