Tuesday 3 July 2018

पाणीप्रश्‍नी भाजपची कसरत!

– पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अडचणीचा
पिंपरी – आळंदीला होणारा अस्वच्छ पाणी पुरवठा हे पिंपरी-चिंचवडकरांचे पाप असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य आणि त्यातच शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही पाणी प्रदुषणाचा मुद्दा सुटेपर्यंत आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरवण्याचा आदेश देणार, असे वक्तव्य केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. एकीकडे पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा तिढा कायम असताना आता आळंदीच्या पाण्याचा प्रश्‍नही समोर ठाकल्याने हे प्रश्‍न हाताळताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment