Tuesday 3 July 2018

#SaathChal पाचशे फिरती स्वच्छतागृहे

देहू - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी देहू ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. पालखी प्रस्थानाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर परिसरातील १५० अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे पालखीमार्ग रुंद झाले आहेत, तर इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहे. देहूतील विविध ठिकाणी ५०० फिरती स्वच्छतागृह सोमवारी ठेवण्यात आली.

No comments:

Post a Comment