Monday 23 July 2018

क्रांतिवीर चापेकर बंधूंनी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली – देवेंद्र फडणवीस

क्रांतिवीर चापेकर बंधूंनी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतावले. संकुचित विचारांपेक्षा देशाचा विचार केला. त्यांनी स्वातंत्र्याची बिजे रोवली. क्रांतीची लढाई उभारली.  त्यांच्या बलिदानाचे मोल जपायला हवे. देशासाठी बलिदान करणा-या चापेकर बंधूंचे विस्मरण होता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवारी) चिंचवड येथे केले. तसेच इतिहास विसरणा-या समाजाला वर्तमान असतो; मात्र भविष्य नसते. स्वराज्य मिळाले आहे. आता आपल्याला सुराज्याची लढाई सुरु करायची आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment