Monday 23 July 2018

औरंगाबाद महापालिकेच्या अगोदर पिंपरी महापालिका बरखास्त करण्यात यावी

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी
पिंपरी : औरंगाबाद महापालिका क्षेत्रात कचरा कोंडी होते आहे. कोंडी सोडविण्यासाठी 100 कोटी कचरा प्रक्रियेची निविदा आजवर पारदर्शकपणे पार पडली नाही. कचरा समस्या सुटण्यासाठी राजकीय पक्षांनी आडकाठी आणून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्यास औरंगाबाद महापालिका बरखास्त करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. परंतु, औरंगाबाद महापालिकेपेक्षा पिंपरी महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यहार झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या अगोदर पिंपरी महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.

No comments:

Post a Comment