Friday 17 August 2018

पिंपरी चिंचवड शहरातून वाजपेयी यांच्या ‘अटल’ आठवणींना उजाळा

माजी पंतप्रधान वाजपेयींना आंदराजली
निर्भीडसत्ता न्यूज –
महामार्ग जोडल्याने देशाची आर्थिक स्थिती भक्कम : महापौर राहुल जाधव 
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतुक सुरळीत होऊन अनेक मोठी शहर एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment