Friday 17 August 2018

पाऊण कोटी खर्चूनही सीमाभिंतीला घरघर

वाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून सदरच्या कामाकरिता आक्षेपही घेण्यात आला. कारण दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे हे लक्षात येत होते. जुनी सीमाभिंतही अनेक वर्षांपासून सुस्थितीत उभी होती. दगडी बांधकाम चांगल्या स्थितीत होते. परंतु टक्केवारीचे राजकारण आणि महापालिका प्रशासनाची भ्रष्टाचारी वृत्ती यामुळे सेक्टर 28 मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मजबूत दगडी भिंतीला नजर लागली.

No comments:

Post a Comment