Wednesday 6 May 2020

EMI साठी आणखी तीन महिन्यांचा दिलासा मिळणार?

देशात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. आर्थिक स्थितीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांकडून तीन महिने ईएमआय न घेण्याच्या सुचना बँकांना केल्या होत्या. त्यानंतर बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय स्थगित करून ईएमआयच्या कालावधीत तीन महिन्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही करोनाचं संकट सुरूच असल्यानं तसंच लॉकडाउनचा कालावधीही वाढल्यानं पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी हा दिलासा देता येईल का यावर रिझर्व्ह बँक विचार करत आहे. इंडियन बँक असोसिएशनकडून ईएमआय मोरेटोरिअमला पुढे वाढवण्यासाठी अनेक सुचना मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच रिझर्व्ह बँक यावर विचारही करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

No comments:

Post a Comment