Thursday 15 June 2017

जनजागृतीसाठी “एजन्सी’चा घाट

स्वच्छ भारत अभियान : पिंपरी महापालिकेला सूचले शहाणपण
पिंपरी,  (प्रतिनिधी) – हागणदारी मुक्‍त शहर योजना प्रभावीपणे राबविण्यात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिका “सपशेल फेल’ ठरली. अपयशाचा डाग पुसून काढण्यासाठी आणि योजना प्रभावी करण्याकरिता आता नवीन एजन्सी नेमण्याचा घाट घातला जात आहे. एजन्सीद्वारे झोपडपट्टी व परिसरात टॉईलेट्‌स वापराचे महत्त्व पटवून देण्याबाबत जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. पालिकेची प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना एका नवीन एजन्सीला काम देण्याची गरज काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment