Sunday 13 May 2018

ऑटो रिक्षा, कार, बस परमिटमुक्त करणार?

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सूतोवाच

'इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, कार आणि बस परमिटमुक्त करण्याचा विचार सुरू असून, नवी दिल्लीला गेल्यानंतर त्याबाबत निर्णय करणार आहे,' असे सूतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुण्यातील सर्व रिक्षा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बायो-इंधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पेट्रोल-डिझेलला सक्षम पर्याय दिला आहे. पुणे आणि परिसरातील साखर कारखान्यांनी बगॅस पासून बायो-इथेनॉल तयार करण्याचे प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

No comments:

Post a Comment